शांती

          शांती ,यज्ञ आदि विधी का करावेत?

हिंदू धर्मातील प्रत्येक पूजन,जप, नामस्मरण, अर्चना, भजन, कीर्तन, अभिषेक,शांती, यज्ञ, प्राणप्रतिष्ठा, विविध संस्कार हे सिद्ध प्रयोग आहेत।

याचाच एक भाग शांती, यज्ञ आहे। जातकाच्या जन्मकाळीं अशुभ किंवा कुयोग असल्यास, ग्रहांचे युती अथवा दृष्टी, ग्रहांची भ्रमण स्थिती, दशा आदिचा अभ्यास मांडून त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात। त्याने मनुष्य अधिक सकारात्मक होऊन अडचणींचा सहज सामना करू शकतो किंवा अडचणींवर मात करू शकतो।
त्यासाठी आवश्यक ती दैवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे सिद्ध प्रयोग केल्याने फायदा होतो। भारतीय संस्कृतीतील आचरण पाळणाऱ्या लोकांचा असा अनुभव देखील आहे।
हे सर्व विधी प्रयोग असून आपले पूर्वज असलेल्या ऋषींनी त्याचे संशोधन करून ठेवलेले आहे।

याच कारणाने हजारो वर्षांपासून ही परंपरा कायम राहिली आहे।

 

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.