गर्भाधान :
देश काल यांचे उच्चारण करून संस्कार कर्त्याने संकल्प करावा की, माझ्या भार्येच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या सर्व गर्भाचे बीज व गर्भापासून उत्पन्न होणारे सर्व पाप दूर होऊन परमेश्वराची प्रीती व्हावी यासाठी गर्भाधानाचा संस्कार करतो ।
त्यानंतर पुन्हा संकल्प करावा की, त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करतो। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। नंतर गर्भाधानाचे अंगभूत दहा ब्राह्मणांचे भोजनाचा संकल्प करावा अथवा प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन करावे।
गर्भाधान संस्कार न केल्यास अथवा चुकून करायचा राहिल्यास प्रयोगपरिजातात आश्वलायन महर्षींनी सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त करावे। गर्भाधान संस्कार न करता उत्पन्न होणारा प्राणी सदोंष होतो। दोषपरिहारार्थ ब्राह्मणांस एक गाय दान द्यावी व पुंसवन नावाचा पुढील संस्कार करावा।
पुंसवन :
देशकालादि संकीर्तन करून आजच्या पुण्यदिवशी माझ्या स्त्रीचे ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या गर्भाचे सर्व दोष निरसन होऊन तो गर्भ सर्व प्रकारे प्रजननशक्तीमान होण्यासाठी परमेश्वराच्या प्रीतीस्तव हा संस्कार गर्भ स्पन्दनापूर्वी करावा। त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। हा संस्कार दुसऱ्या -तिसऱ्या मासात करावा। या संस्काराचे पुण्यफळ मिळण्यासाठी दहा ब्राह्मण भोजनाचा संकल्प अथवा प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन करावे।
सीमंतोन्नयन :
देशकालादि संकीर्तन करून आजच्या पुण्यदिवशी स्त्रीचे ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या गर्भाचे सर्व दोष निरसन होऊन त्या गर्भास सर्व प्रकारे अवयवाची वृद्धी होण्यासाठी तसेच गर्भाचे ठिकाणी उत्पत्ती सहकृत पाप दूर करण्यासाठी परमेश्वराच्या प्रीतीस्तव हा संस्कार करावा। त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। त्यानंतर इष्ट हवनादी कर्म करावे। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत।
जातकर्म :
बाळ झाल्यावर पित्याने नदीवर पूर्वेकडे तोंडकरून स्नान करावे। किंवा घरातच सुवर्णयुक्त थंड पाण्याने स्नान करावे। नाळ छेदन करण्यापूर्वी सुतकादी व्यतिरिक्त मनुष्याकडून स्पर्श न झालेल्या, स्तनपान न केलेल्या व ज्याचा मला स्वच्छ धुवून टाकला आहे अशा बालकास मातेने मांडीवर प्राङ्मुख निजवावे। प्राणायाम, पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी माझ्या मुलाचे गर्भामध्ये जलपान केल्यापासून उत्पन्न झालेले सर्व दोष नष्ट होऊन आयुष्य व धरणावती बुद्धी यांची अभिवृद्धी होऊन व बीज आणि गर्भ यांच्यापासून उत्पन्न झालेल्या पातकांचा नाश होऊन त्याद्वारे श्रीपरमेश्वराच्या प्रीतीसाठी जातकर्म नावाचे कर्म करतो। त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन , वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। त्यानंतर इष्ट हवनादी कर्म करावे। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। नांदीश्राद्ध हिरण्याने करावे। उत्पन्न झालेल्या बाळाचे नालच्छेदन होण्यापूर्वी पित्याने मेधाजनन आणि आयुष्यकरण ही दोन कर्मे करावीत ।
नामकरण :
आचमन, प्राणायाम, पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी या कुमाराचे बीज व गर्भ यांच्यापासून उत्पन्न होणारे पाप दूर होऊन आयुष्याची वृद्धी व व्यवहार सिद्धी होण्यासाठी श्री परमेश्वराच्या प्रीतीस्तव नामकरण नावाचा संस्कार करतो।
त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन , वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। नामकरणाच्या पुर्वांग तीन ब्राह्मणांना भोजन देईन असा संकल्प करावा।
नामदेवतेचे पूजन करावे। काशाच्या पात्रात तांदूळ पसरवून सोन्याच्या तारेने अथवा चौरंगावर शुभ्र वस्त्र पसरवून त्यावर लाल अक्षरात सोन्याच्या तारेने
प्रथम नाम दैवी (कुलदैवताचे ) ,
द्वितीय- मास नाम,
तृतीय- नक्षत्र नाम,
चतुर्थ – व्यावहारिक नाम
लिहून या बालकास संपूर्ण आयुष्य मिळण्यासाठी परमेश्वराच्या प्रीतीस्तव नामदेवतेचे पूजन करितो असा संकल्प करून त्या नामांचे पूजन करावे। पित्याने बाळाच्या उजव्या कानात क्रमाने नांवे सांगावीत। चारही नांवे ठेवल्यानंतर देव, ब्राह्मण, गुरु, ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद घ्यावा। मिठाई वाटावी बाकी लौकिक उपचार करावेत।
निष्क्रमण :
आचमन, प्राणायाम, पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी या कुमाराचे आयुष्याची वृद्धी व व्यवहार सिद्धी होण्यासाठी श्री परमेश्वराच्या प्रीतीस्तव निष्क्रमण नावाचा संस्कार करतो असा संकल्प करावा। त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। नंतर जातकाचे वडील -आई यांनी वाद्यघोष करीत जातकास सूर्यदर्शन करावे। त्याच दिवशी रात्री चंद्रदर्शनही करावे, नंतर दहा ब्राह्मण भोजनाचा संकल्प करावा। व त्यांचे आशीर्वाद घेऊन दक्षिणा आदी दान करावे।
अन्नप्राशन:
आचमन, प्राणायाम, पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी या कुमारास मातेच्या गर्भात असताना मातृकर्मक अमंगल पदार्थाचे सेवनाने आलेली अशुद्धता दूर होऊन अन्नपदार्थ खाण्याचे सामर्थ्य , ब्रह्मवर्चस तेज , इंद्रिय पुष्टी, आयुष्य, बळ या स्वरूपाचे फळ मिळण्यासाठी आणि बीज गर्भापासून उत्पन्न होणाऱ्या पापाच्या निवृत्तीसाठी श्री परमेश्वराच्या प्रीतीस्तव अन्नप्राशन नावाचे कर्म करतो असा संकल्प करावा।
त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन , वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। त्यानंतर इष्ट हवनादी कर्म करावे। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। नंतर पित्याने मुलास आईच्या मांडीवर बसवून सुवर्णाचे पात्रात सर्व प्रकारचे चोष्य, पेय, लेह व खाद्य पदार्थ आणि कटू, तिक्त, आम्ल, मधुर, क्षार, कषाय (काढा) असे षड्रस सोन्याच्या चमच्याने प्राशन करावे। नंतर दहा ब्राह्मण भोजनाचा संकल्प करून त्यांना द्रव्य दक्षिणा आदी दान द्यावे।
चौल :
आचमन, प्राणायाम, पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी या कुमारचा बीज व गर्भ यांच्यापासून उत्पन्न होणार दोष दूर होऊन तेज ,आयुष्य , बळ यांची वृद्धी व व्यवहार सिद्धी व्हावी यासाठी श्री परमेश्वराच्या प्रीतीस्तव चौल नावाचे कर्म करतो असा संकल्प करावा।
त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन , वसोर्धारा पूजन , आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। इष्ट हवनादी कर्म करावे। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। तीन ब्राह्मणांच्या भोजनाचा संकल्प करावा।
अतीत संस्कार प्रायश्चित्त :
कुमाराचे गर्भाधानादि संस्कार शास्त्रोक्त काली पार पाडले गेले नसल्याने मुख्य काळाचा हानीरूप दोष घडतो। त्याचे दोष दुरीकरण पूर्वक अधिकारसिद्धी व परमेश्वराच्या प्रीतीस्तव अनादिष्ट प्रायश्चित्त निमित्तक होम करतो असा संकल्प करून हा संस्कार जाणकार पुरोहिताकडून करून घ्यावा।
उपनयन :
हा संस्कार व्हायच्या आठव्या वर्षी करावा। ते शक्य नाही झाले तर गुरुबल , ताराबळ आदी शुभ दिवशी ज्योतिषांच्या सल्याने करावा। आचमन, प्राणायाम , पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी या कुमारचा उपनयन संस्कार करण्याच्या अधिकारासाठी म्हणून श्री परमेश्वराच्या प्रीतीस्तव तीन कृच्छ नावाचा संस्कार करतो असा संकल्प करावा।
त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। प्रत्येक कृच्छास एक गाय अथवा गोमूल्य किंवा शास्त्रोक्त प्रतिनिधी द्वारा मी आचरण करतो असा संकल्प पित्याने करावा ।
नंतर बटूनेही आचमनादि केल्यानंतर देश काळ यांचे संकीर्तन करून माझ्याकडून आजपर्यंत जे कर्तव्य अथवा कर्तव्यविचार शून्य अर्थात अशास्त्रीय कामाचार तसेच कामवाद व कामभक्षण घडले असेल , त्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषाचे निराकरण होऊन मला उपनयनाची योग्यता प्राप्त व्हावी म्हणून व परमेश्वराच्या प्रीतीस्तव मी तीन कृच्छ प्रायश्चित्त प्रत्येक कृच्छास कपर्दिका मानाने होणाऱ्या गोमुल्य रूपाने किंवा शास्त्रोक्त प्रजापत्यादी प्रतिनिधीद्वारा आचरण करितो असा संकल्पकरून ते प्रायश्चित्त शास्त्रोक्त प्रतिनिधीद्वारा आचरण करावे।
नंतर पित्याने गायत्री उपदेशाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी १०००० (दहा हजार ) गायत्री जप करितो असा संकल्प करून तो जप करावा, तसेच कुमारचे आज व उद्या केल्या जाणाऱ्या उपनयनाचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन , आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करितो असा संकल्प करावा ।
मातृभोजन, उपनयन संस्कार अंगभूत मंगलाष्टक , गायत्री उपदेश , हवन , भिक्षावळी आदी शास्त्रोक्त विधी जाणकार पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली करावेत।
वेदारंभ :
आचमन, प्राणायाम, पवित्र धारण करून देशकाल संकीर्तन करावे व संकल्प करावा की आजच्या शुभ पुण्यकारक दिवशी या ब्रह्मचाऱ्याचा स्वशाखापूर्वक वेदारंभ संस्कार करितो।
त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन , वसोर्धारा पूजन , आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। जाणकार पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली हवनादी कर्म करावे।
केशांत :
केशांत हा संस्कार वयाच्या १६ किंवा १७ व्या वर्षी करावा। त्यात मंडप विधी व मुहूर्तादि विचार चौल संस्काराप्रमाणे जाणावा। आचमनादि देशकाल यांचे संकीर्तन करून मी या ब्रह्मचाऱ्याचा केशांतसंस्कार करतो असा संकल्प करावा।
त्या अंगभूत अविघ्नपूजन , मंडपस्थापन, मातृकापूजन , वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। केशांतचे अंगभूत तीन ब्राह्मणांचा भोजनाचा संकल्प करून ब्राह्मण भोजन करावे। हवनादी विधी जाणकार पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली करावेत ।
ब्रह्मचारी व्रतलोप प्रायश्चित्त :
ब्रह्मचाऱ्यानेआचमन प्राणायाम करून पवित्रधारण, देशकाल संकीर्तन करावे। नंतर शौच,आचमन, संध्या , दर्भहरण, भिक्षा, समीदाधान यांचे वर्जन व शूद्रादिकांशी स्पर्श करणे, कौपिन (लंगोट) , कटिसूत्र , वस्त्र , यज्ञोपवीत, मेखला , दण्ड , कृष्णाजीन यांचा त्याग तसेच दिवसा झोप, छत्र, पादुका व माला यांचे धारण, उटणे व अत्तर लावणे, काजळ घालणे, जलक्रीडा , फांसे, नाच, गायन व वाद्य इत्यादी विषयाचे ठिकाणी अभिरती (इच्छा ) ठेवणे। नास्तिक, पतित, इत्यादिकांशी संभाषण करणे, शिळे अन्न खाणे यापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व दोषांचे निवारणार्थ तीन कृच्छ प्रायश्चित्त करून अनादीष्ट प्रायश्चित्ताचा होम करतो असं संकल्प करावा। हवनादी विधी जाणकार पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली करावेत ।
समावर्तन :
आचमन प्राणायाम करून पवित्रधारण, देशकाल संकीर्तन करावे। नंतर या ब्रह्मचाऱ्याच्या गृहस्थाश्रम प्राप्तीसाठी व श्री परमेश्वर प्रीतीस्तव मी समावर्तन संस्कार करतो असा संकल्प करून करून त्या अंगभूत पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। जाणकार पुरोहिताकडून शास्त्रोक्त पद्धतीने सम्पूर्ण विधी व्यवस्थित करून घ्यावेत।
विवाह संस्कार:
1) मुहूर्त पूजन
(सहभाग: वर/वधु , त्यांची आई किंवा यजमानीन बाई व इतर सुवासिनी.)
दरवाजात मंडप घालावा.
वर/वधू त्यांचे आईवडीलांना सुवासिनीनी स्नान घालून, शुभ्र (नवीन किंवा स्वच्छ) वस्त्रं परिधान करून मळवट भरावा. या सर्वांच्या पायावर स्वस्तिक काढावे.
घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचे चित्र काढावे अथवा लावावे. पिवळ्या कपड्याच्या पट्ट्या तयार करून त्यामध्ये लेकुरवाळी हळकुंड बांधावे. त्या पट्या स्तंभ, मृन्मयी कलश (माठ), मुसळ, जाते या सर्व उपकरणास ते बांधाव्यात.
मृण्मयी कलश मंडपाच्या खांबाजवळ ठेवुन त्यात वर/वधू व त्यांच्या आईवडीलांनी पाणी भरावे. त्याच्यावर अजुन एक छोटा कलश स्थापन करावा. त्यासही पिवळा कपडा … बांधावा व पूजन करावे.
No Comments
Sorry, the comment form is closed at this time.